| A Click by: Sushil Ladkat |
“काय म्हणतायत तुमचे मित्र?”
“सगळे मस्त आहेत बाबा.”
“तशा सारख्या parties चालू असतातच तुमच्या.
म्हणजे खुश दिसताय...”
“बाबा, you know ही सगळी पार्टीप्रिय मंडळी
आहेत. It’s fun... right?”
“हं...”
नीरज बाबांशी हे बोलत असताना त्याच्या फोन वर
काहीतरी करण्यात मग्न होता. आज नीरजच्या बाबांना नीरजशी गप्पा मारायला तसा निवांत
वेळ मिळाला होता. किती दिवस ते खरंतर या विषयावर त्याच्याशी बोलायचा विचार करत
होते. आज त्यांनी बोलायचं ठरवलं. नीरजचं typical teenager सारखं वागणं अगदीच
त्याच्या वयाला शोभणारं होतं. मात्र बाबांना हे ही जाणवत होतं की नीरजची संगत
म्हणावी तितकी चांगली नाही. अगदी वाईट होती अशातला भाग नाही. नीरजला म्हणायला खूप
मित्र होते. मात्र त्यांच्या मते ते नावापुरतेच होते. नीरजचा एकच खरा मित्र होता
अभिनव ज्याच्याशी सध्या नीरज बोलत नव्हता. त्याच्यावाचून आपलं काही अडत नाही आणि
आपल्याला बाकीचे खूप मित्र आहेत हे तो दाखवत होता. बाबांच्या मते हे त्याचं फक्त
cover होतं. बाबांनी थेट विषयालाच हात घातला.
“नीरज, या तुमच्या मित्रांमधला एक तरी मित्र
तुला काही झालं तर वेळेला उभा राहील का?”
“हा काय प्रश्न आहे का? एक आवाज दिला की
येतील.”
“दे मग आवाज.”
“काय?”
“Let’s take a test.”
“बाबा, माझा माझ्या मित्रांवर पूर्ण विश्वास
आहे.”
“माझा नाही.”
“बाबा..”
“See, if you are confident, then prove it.
एक छोटी test. चल, जो मित्र पहिल्यांदा येईल त्याला माझ्याकडून party.”
“बाबा, be careful. खूप जण येतील.”
“ते माझ्यावर सोड. कोणालाही फोन कर आणि सांग.
आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये. मी संकटात आहे. बाकी काहीच बोलू शकत नाही. तुझी
गरज आहे.”
“एवढंच?”
“हो. reply ची पण फार वाट पाहू नकोस. let’s
see कोण येतंय?”
नीरजने पटापट फोन फिरवले. बाबांनी सांगितलेली
tape सर्वांना ऐकवली. पुढचे २ तास ते वाट बघत बसले. कोणीच आलं नाही. नीरज अस्वस्थ
होत होता.
“आज तशी सुट्टी आहे ना... त्यामुळे busy
असायचं कारण नाही कोणाचं. नाही का?” बाबा बोलत होते. “आणि मी काय म्हणतो, अभिनव ला
एखादा फोन...”
बाबांचं वाक्य तोडत नीरज म्हणाला, “नाही.”
बाबा म्हणाले, “बरं. कोणी येत नाहीये
तोपर्यंत एक गोष्ट ऐकणार. ऐकच. संजू आणि राजू असे २ मित्र जंगलातून जात होते. राजू
मोठ्या तोऱ्यात म्हणत होता की तुला काही लागलं तरी आपण आहे. तेवढ्यात एक अस्वल
येताना दोघांनी पाहिलं. राजूला शेजारी एक उंच झाड दिसलं आणि तो त्या झाडावर पटकन
चढून बसला. संजूला झाडावर चढता येत नव्हतं. अस्वल जवळ येतंय हे कळताच तो तिथेच
आडवा झाला. श्वास रोखून धरत त्याने मेल्याचं सोंग केलं. अस्वल मेलेलं काही खात
नाहीत हे त्याने ऐकलं होतं. किमान याने तरी आपल्याला खाऊ नये अशी तो आशा करत होता.
अस्वल जवळ आलं. त्याच्या कानापाशी, तोंडापाशी त्याने थोडं हुंगलं आणि सरळ निघून
गेलं. ते लांब गेल्यावर राजू झाडावरून उतरला आणि संजूला म्हणाला, “काय रे? तुझ्या
कानात त्याने काय सांगितलं?” संजू शांतपणे म्हणाला, “ते म्हणालं की त्या झाडावर
बसलेल्या मुलाशी कधीच मैत्री करू नकोस. जो संकटकाळी तुला सोडून गेला.”
तेवढ्यात बेल वाजली.
नीरज खुश होत म्हणाला, “मी म्हटलं होतं. कोणी
ना कोणी येणार. मीच उघडतो दार.”
नीरजने दार उघडलं. समोर एक मुलगा खूप अस्वस्थ
होता. नीरज दिसताच त्याला हायसं वाटलं. नीरज अवाक होऊन पाहत राहिला. समोर अभिनव
होता. अभिनव घाईघाईत बोलू लागला, “नीरज यार, तू ठीके ना.. काय झालं? बाबांनी message
केला की तू संकटात आहेस आणि त्यांना पोहोचायला वेळ लागतोय.”
तेवढ्यात बाबांनी मध्यस्थी केली, “are अभी तू
तर गावाला होतास ना..”
अभिनव म्हणाला, “हो message बघून तशीच kick मारली
आणि निघालो. म्हणून तर २ तास लागले. Is everything all right?”
नीरज आणि बाबांची नजरानजर झाली. बोलण्यासारखं
काहीच नव्हतं. नीरजला फक्त बाबांनी मगाशी म्हटलेलं वाक्य आठवलं, “दोस्त कमी असले
तरी चालतील पण वेळेला ते आपल्यासोबत उभे असले पाहिजेत.”
-वरुण भागवत
Sahi hai
ReplyDeleteगोष्टीची खूप छान मांडणी
ReplyDeleteGoshta shevatparent rangat aanalis! 📝
ReplyDeleteKhup Chan !👌👍
Khup chan
ReplyDeleteआजच्या पिढीतील तरुणांचे डोळे उघडणारी कथा
ReplyDelete