Skip to main content

खेकडा आणि scope

A click by: Varun Bhagwat

खेकडा हा जास्तीत जास्त समुद्रकिनारी आढळणारा प्राणी. ३ खेकडे मित्र जमले. यातल्या दोघांना एकदा लहर आली दुसरीकडे जाण्याची. त्यांचा जंगलाकडे जाण्याचा विचार झाला. तिकडे त्यांना भक्ष्य मिळवण्याच्या दृष्टीने बरंच ‘कुरण’ मिळेल असं जाणवलं. म्हणजेच तिकडे जास्त scope जास्त आहे अशी त्यांची धारणा झाली.

एक मात्र त्यांच्याशी सहमत नव्हता. एवढा फायदा होऊ शकतो असं त्यांच्या बोलण्यातून वाटत असून सुद्धा त्याला काय वाटलं कोणास ठाऊक आणि तो म्हणाला, “तिकडे जाण्याच्या दृष्टीने त्या प्रभागाची संपूर्ण माहिती, ज्ञान, आपली तिथे टिकण्याची क्षमता आपण विचारात घेतली पाहिजे .आपण तिकडे टिकणार नाही. हे आपलं क्षेत्र आहे. आपण इथे जास्त प्रगती करू शकतो.”


दुसरा म्हणाला, “काय negative विचार आहेत याचे.”

तिसरा म्हणाला, “नाहीतर काय, ह्याला नवीन काही नकोच आहे.”

पहिला म्हणाला, “मला नवीन नकोय असं नाहीये. पण ज्या क्षेत्रात मी बरं काम करतोय, अर्थात या समुद्रात, तिथे मी mastery मिळवेन ना.  माझ्या मते ही अविचारी रिस्क आहे.”

“ह्याला सोड. ह्याला तिथलं कुरण दिसत नाहीये. तू मर इथेच.” असं म्हणून त्याला सोडून बाकी दोघांनी आपला मोर्चा जंगलाकडे वळवला सुद्धा. प्रवास अवघड होता. पण फायदा पाहून ते जात राहिले. काही काळाच्या प्रवासाने ते तिकडे पोचले. 

A click by: Varun Bhagwat

नवीन प्रदेशाचं नाविन्य होतंच. त्यामुळे सुरुवातीला मजा येत होती. मात्र त्यांनी इथले धोके समजूनच घेतले नव्हते. निर्णयाचा सारासार विचार झाला नव्हता. तिथे पोचताच काही कालावधी मजेत गेला मात्र नंतर एका कोल्ह्याला यातल्या एका खेकड्याची विशेष मेजवानी प्राप्त झाली.

दुसरा खेकडा प्रचंड घाबरला. समुद्रकिनारी खेकड्याला अनेक भक्ष्य मिळायची. त्याने हा विचार कधीच केला नव्हता की इकडे आपण पण इतर कोणाचं भक्ष्य बनू शकतो.

माणसांना जसा एखाद्या क्षेत्रात जास्त scope दिसतो, पैसा दिसतो आणि मग त्या दृष्टीने कल तिकडे वळतो आणि मग एकाच्या नादाने बाकीचे जण तिकडे वळतात... बाकी विचार होत नाही. क्षेत्र निवडताना फक्त तिथला फायदा बघून उपयोग नसतो. त्या जोडीने आपली तिथे टिकण्याची क्षमता, आपला आवाका, आपलं skill, ज्ञान, आवड, तिथले धोके हे लक्षात घेणं गरजेचं असतं. तर आपण तिथे टिकतो.

हा घाबरलेला खेकडा परत त्याच्या जुन्या जागी परतला. त्याच्या मित्राला भेटला. त्याला पूर्ण हकीकत सांगितली.

इथे असणारा खेकडा म्हणाला, “अरे पण तिकडे बराच scope आहे ना?”

“प्रश्न scope चा नाही. पण तुझं म्हणणं योग्य आहे. स्वतःचे skills समजून न घेता घेतलेला अविचारी निर्णय ‘अर्थ’पूर्ण असेलच असं नाही. आपण आपल्याला ओळखलं पाहिजे आणि क्षेत्र निवडलं पाहिजे.” आणि म्हणाला,

“Sorry. Can I join you?”

“विचारायचं काय त्यात? समुद्र आपलाच आहे. welcome back.”

A Click by: Varun Bhagwat

-       वरुण भागवत

-  

Comments

  1. Aajachya images ne tar ajunach maja aanali

    ReplyDelete
  2. अर्थावरील खरच अर्थपूर्ण लेखन

    ReplyDelete
  3. Good thinking and attitude also

    ReplyDelete
  4. 'अर्थ'पूर्ण लेखन..

    ReplyDelete
  5. लीला राजगेJune 9, 2020 at 2:23 PM

    सुंदर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...