Skip to main content

भांडण

A Click by: Sushil Ladkat


एकदा काही कारणावरून एकाच team मध्ये असणाऱ्या रंजन आणि शार्दुल यांच्यामध्ये वादावादी झाली. मात्र थोड्याच वेळात त्या दोघांमधल्या senior ने अर्थात शार्दुलने पटकन हार मानली आणि म्हणाला, “तुझं बरोबर आहे, रंजन... आपण नंतर बोलू. आत्ता इथे नको.”

यानंतर मध्ये २ दिवस गेले. शार्दुल त्याच्या cabin मध्ये एकटाच बसला होता. रंजन cabin चा दरवाजा knock करत आतमध्ये आला. काही काळ तो काही बोलेचना. मग शार्दुलनेच विचारलं, “काय रे, anything serious?” रंजन म्हणाला, “नाही. nothing.” शार्दुलला आश्चर्य वाटून तो म्हणाला, “काहीच नाही. मग काही काम आहे का?” रंजन उत्तरला, “काम असं नाही. पण बोलायचं होतं.” शार्दुलने laptop lock केला आणि म्हणाला, “बोला.” रंजन म्हणाला, “Actually, परवा जो आपला वाद झाला, तो data मी पुन्हा पाहिला आणि मग लक्षात आलं की you were right. माझंच चुकलं होतं.”

“हं...” शार्दुलने respond केलं.

“पण शार्दुल, you are senior. तुझं बरोबर पण होतं. पण मग तू तिथे माझं बरोबर आहे असं का म्हणालास?”

“ती जागा वाद घालण्याची नव्हती.”

“मी समजलो नाही.”

“तुला दोन सिंहांची गोष्ट माहितीये?”

“इथे सिंह कुठून आले?”

“ऐक तर. दोन सिंह एकाच वेळी पाणवठ्यावर पोचले. आता २ सिंह ना ते. Ego आडवे आले, आधी पाणी कोणी प्यायचं यावरून. अर्थात झोंबाझोंबी सुरु झाली. ते इतके भांडले की दोघेही या फालतू कारणावरून जीव गमावून बसले असते.”

“मग मेले का दोघं?”

“नाही. त्यांच्यातलं त्राण कमी होऊ लागलं. तेवढ्यात त्यातल्या एकाने वरती गिधाडं फिरताना पाहिली. त्याला कळून चुकलं की ही आपल्या मरण्याची वाट पाहतायत. आपण मेलो की आपल्यावर ताव मारायला हे मोकळे. म्हणून त्या दोघांनी सलोखा केला आणि तो सिंह दुसऱ्याला म्हणाला, “तुझं होऊ दे. मग मी पाणी पितो.”

“दोघे वाचले?”

“Absolutely. आता हा scenario त्या दिवसाशी relate कर. आपला वाद नेमका मोकळ्या जागी चालू होता जिथे इतर सर्वांचा वावर असतो. Team मधल्या लोकातच झालेली भांडणं बाकीच्या लोकांसाठी अनेकदा फायद्याची असतात. असे काही लोक असतात जे आपल्या वाईटावर टपलेले असतात. I knew की माझं बरोबर होतं, तिथे तुला हरवून मी माझा ego सुखाऊ शकलो असतो. पण आपण चांगल्या terms वर काम करत नाही असं उगाचच बाहेरच्यांना वाटलं असतं. रंजन, तिथे स्वत:चा फायदा बघणारे लोक होते ज्यांना कुणकुण लागली असती की यांच्यात आपसात मतभेद आहेत. अशा गिधाडांपासून सावध राहणं आणि तुला सावध करणं हे जास्त महत्त्वाचं. मी बरोबर आहे या पेक्षा आपण सोबत असणं माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे.”  

 

-       वरुण भागवत

-  

Comments

  1. शार्दूल अंगी बाणावा म्हणजे नक्कीच गिधाडांचं फावत नाही, मस्त कथा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...