Skip to main content

भांडण

A Click by: Sushil Ladkat


एकदा काही कारणावरून एकाच team मध्ये असणाऱ्या रंजन आणि शार्दुल यांच्यामध्ये वादावादी झाली. मात्र थोड्याच वेळात त्या दोघांमधल्या senior ने अर्थात शार्दुलने पटकन हार मानली आणि म्हणाला, “तुझं बरोबर आहे, रंजन... आपण नंतर बोलू. आत्ता इथे नको.”

यानंतर मध्ये २ दिवस गेले. शार्दुल त्याच्या cabin मध्ये एकटाच बसला होता. रंजन cabin चा दरवाजा knock करत आतमध्ये आला. काही काळ तो काही बोलेचना. मग शार्दुलनेच विचारलं, “काय रे, anything serious?” रंजन म्हणाला, “नाही. nothing.” शार्दुलला आश्चर्य वाटून तो म्हणाला, “काहीच नाही. मग काही काम आहे का?” रंजन उत्तरला, “काम असं नाही. पण बोलायचं होतं.” शार्दुलने laptop lock केला आणि म्हणाला, “बोला.” रंजन म्हणाला, “Actually, परवा जो आपला वाद झाला, तो data मी पुन्हा पाहिला आणि मग लक्षात आलं की you were right. माझंच चुकलं होतं.”

“हं...” शार्दुलने respond केलं.

“पण शार्दुल, you are senior. तुझं बरोबर पण होतं. पण मग तू तिथे माझं बरोबर आहे असं का म्हणालास?”

“ती जागा वाद घालण्याची नव्हती.”

“मी समजलो नाही.”

“तुला दोन सिंहांची गोष्ट माहितीये?”

“इथे सिंह कुठून आले?”

“ऐक तर. दोन सिंह एकाच वेळी पाणवठ्यावर पोचले. आता २ सिंह ना ते. Ego आडवे आले, आधी पाणी कोणी प्यायचं यावरून. अर्थात झोंबाझोंबी सुरु झाली. ते इतके भांडले की दोघेही या फालतू कारणावरून जीव गमावून बसले असते.”

“मग मेले का दोघं?”

“नाही. त्यांच्यातलं त्राण कमी होऊ लागलं. तेवढ्यात त्यातल्या एकाने वरती गिधाडं फिरताना पाहिली. त्याला कळून चुकलं की ही आपल्या मरण्याची वाट पाहतायत. आपण मेलो की आपल्यावर ताव मारायला हे मोकळे. म्हणून त्या दोघांनी सलोखा केला आणि तो सिंह दुसऱ्याला म्हणाला, “तुझं होऊ दे. मग मी पाणी पितो.”

“दोघे वाचले?”

“Absolutely. आता हा scenario त्या दिवसाशी relate कर. आपला वाद नेमका मोकळ्या जागी चालू होता जिथे इतर सर्वांचा वावर असतो. Team मधल्या लोकातच झालेली भांडणं बाकीच्या लोकांसाठी अनेकदा फायद्याची असतात. असे काही लोक असतात जे आपल्या वाईटावर टपलेले असतात. I knew की माझं बरोबर होतं, तिथे तुला हरवून मी माझा ego सुखाऊ शकलो असतो. पण आपण चांगल्या terms वर काम करत नाही असं उगाचच बाहेरच्यांना वाटलं असतं. रंजन, तिथे स्वत:चा फायदा बघणारे लोक होते ज्यांना कुणकुण लागली असती की यांच्यात आपसात मतभेद आहेत. अशा गिधाडांपासून सावध राहणं आणि तुला सावध करणं हे जास्त महत्त्वाचं. मी बरोबर आहे या पेक्षा आपण सोबत असणं माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे.”  

 

-       वरुण भागवत

-  

Comments

  1. शार्दूल अंगी बाणावा म्हणजे नक्कीच गिधाडांचं फावत नाही, मस्त कथा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...