Skip to main content

यशाचं शिखर

A click by: Varun Bhagwat

खूप मोठे आणि यशस्वी उद्योगपती सुरंजन यांना नुकतच एक award मिळालं होतं.  त्याप्रित्यर्थ त्यांचा interview चालू होता. interviewer अजित चे प्रश्नांवर प्रश्न चालू होते. त्याला सुरंजन फार सुरेख उत्तरं देत होते.

“सर्वांनीच बोध घ्यावा असे तुमचे विचार आहेत sir.” अजित म्हणाला.

सुरंजन फक्त हसले.

“सर, तुम्ही यशाच्या ज्या शिखरावर सध्या आहात तिथून सगळीकडे बघताना कसं वाटतंय? सगळं आता फार सोपं वाटत असेल नाही?”

“बिलकुल नाही.”

अजितला उत्तर अनपेक्षित होतं. तो म्हणाला, “तुम्हाला रोखणारा कोण आहे? तुम्ही top वर आहात असं म्हणायला हरकत नाहीये.”

“Top वगैरे फार तात्पुरतं असतं.”

“As in?”

“आपण कोणत्याही शिखरावर पोहोचलो तरी कोणतीच गोष्ट casually घेऊन चालत नाही. तू म्हणतोस तसं so called यशाच्या शिखरावर असताना तर मुळीच नाही. You need to be alert all the time. कोणालाच कमी लेखायचं नाही.”

“ते तर खरंय सर.”

“खूप खरंय. माझ्या उद्योगाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मी हा धडा शिकलो की Never take anyone and anything for granted. हे ही शिकलो की दुसऱ्याच्या अनुभवावरूनही आपण शिकूच शकतो.”

“असं नेमकं काय घडलं?”

“आज तारीख काय आहे?”

“२५ जून.”

“हीच तारीख आणि काही वर्षं मागे जाऊया.”

“मला कळलं नाही.”

“India ने आपला पहिला- वहिला cricket world cup केव्हा जिंकला?”

“१९८३.”

“हो. २५ जून १९८३.”

“पण त्याचा not taking anything for granted शी काय संबंध?”

“ऐक तर खरं. त्या काळी West-Indies ही अभेद्य team होती. त्यांनी already २ world-cups खिशात टाकले होते. १९८३ ला अर्थात तिसऱ्या world cup ला final match ला सुद्धा ते पोचले आणि तिसरा world  cup खिशात घालायची तयारी करत होते. भारत विरुध्द वेस्टइंडीज असा सामना रंगणार होता. तुमच्या सारख्या अनेक news वाल्यांनी तर जवळपास declare केलं की वेस्टइंडीज तिसरा world cup जिंकायच्या तयारीत!”

“पण जिंकलो आपण. India...”

“Right.”

“असं का झालं असेल?”

“कारण वेस्टइंडीज ने India ला फार casually घेतलं.”

“Yes. अवघा १८३ score भारत करू शकला होता. ते target विंडीजला ६० overs मध्ये गाठायचं होतं. Match हातातली होती. पण ह्यात काय विशेष आहे असा काहीसा त्यांचा विचार झाला असावा आणि यशाच्या उच्च शिखरावर असताना दाणकन खाली आपटायची वेळ त्यांचावर आली.”

“True.”

“हे झालं तू मगाशी मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. आपण कुठेही पोहोचलो तरी झाकीत जायचं नाही. काम पूर्ण होईतो celebrate करायची गडबड करायची नाही. कारण जोपर्यंत result लागत नाही तोपर्यंत कोणतीच team जिंकलेली नसते.”

 

-       वरुण भागवत


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...