Skip to main content

संगत

A click by: Varun Bhagwat



भाऊ आणि नाना लहानपणापासूनचे मित्र. आज २० वर्षांनी त्यांची गाठ पडली. दोघे साठीच्या उंबरठ्यावर होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांच्या गप्पांनी थोडं वेगळं वळण घेतलं. नाना बोलता बोलता म्हणाले,

“अरे त्या आपल्या अप्पाचा काही contact नाही.”

“नाही तेच बरंय.” भाऊ बोलून गेले.

 “असं का बरं?” नानांनी विचारलं.

“अप्पाचं वाईट वाटतं. पण काय करणार?” भाऊ म्हणाले.

“मला नीट सांगशील?”

भाऊ सांगू लागले,  “नाना, त्या अप्पाच्या पोरांमध्ये काय जमीन- अस्मानाचा फरक आहे. त्याची पोरं संजू आणि विजू. सख्खे भाऊ. पण संजू इतका गुणी आणि विजू मात्र गुन्हेगारी मार्गाला लागला.”

“होय?”

“हो  ना.  तसा माझा पण contact नव्हता. पण इतक्यात समजलं. नाना, हे असं घडू शकतं? दोन सख्खे भाऊ आणि इतका फरक?”

“घडू शकतं भाऊ.”

“कसं?”

“जसं दोन पोपटांच्या बाबतीत घडू शकतं तसं संजू-विजूच्या बाबतीत पण घडू शकतं.”

“पोपट कुठून आले नाना?”

“अरे तुला ती पोपटाची गोष्ट आठवते का?”

“कोणती रे?”

“एका पोपट विकणाऱ्या माणसाने एका शेठजीला दोन पोपट विकले. एकाची किंमत ५ रुपये आणि दुसऱ्याची १०० रुपये. शेठजीला किमतीतला फरक पाहून धक्काच बसला. पण पोपट विकणारा मनुष्य म्हणाला, “विश्वास ठेवा. मी उगाच नाही विकत आहे असं.” शेठजीने पैशाचा फार विचार न करता दोन्ही पोपट विकत घेतले. १०० रुपयाचा पोपट त्याने स्वतःच्या खोलीत ठेवला. ५ रुपयाचा पोपट त्याने hall मध्ये ठेवला. शेठजी झोपून गेला. दुसऱ्या दिवशीची शेठ्जीची सकाळ त्या खोलीतल्या पोपटाच्या गाण्याने झाली. त्याने छानपैकी शेठजीचं मनोरंजन केलं. शेठजी hall मध्ये ५ रुपयाच्या पोपटापाशी आला. तो पोपट काहीच बोलेना. शेठ्जीला वाटलं हा काही बोलत नाही म्हणून याची किंमत कमी असावी. शेठ्जीने दोघांना खायला पेरू आणि मिरची दिली. १०० रुपयाच्या पोपटाने आवडीने ते खाल्लं. मिरची थोडी तिखट लागली हे ही त्याने स्पष्ट सांगितलं. ५ रुपयाच्या पोपटाने ते खाल्लं आणि तिखट लागताच तो अतीशय घाणेरड्या शिव्या घालू लागला. शेठजीला आता मात्र त्याचे खरे रंग आणि किंमत कळली.”

“नाना पण संजू-विजू सख्खे भाऊ.”

“ऐक रे. गोष्ट संपली नाहीये. काही दिवसांनी शेठजीची पोपट विकणाऱ्या माणसाशी गाठ पडली. तो म्हणाला, शेठजी कळलं त्यांच्या किमतीत इतका फरक का ते?” यावर शेठजी म्हणाले, “पण असं कसं?” पोपट विकणारा हसून सांगू लागला, “खरंतर हे दोन पोपट सख्खे भाऊ. पण यातला एक जण या आधी अशा माणसाकडे होता जो सज्जन होता. उत्तम बोलायचा, छान गायचा. त्याची संगत याला लाभली; पण दुसरा मात्र अशा ठिकाणी होता जो घरच्या व्यक्तींनाच शिव्या द्यायचा. वाईट वागायचा. म्हणून हे असे झाले.”  

“संगतीचा इतका परिणाम नाना?” भाऊ विचारत होते.

“हं... म्हणून तुला मगाशी म्हणालो, जसं दोन पोपटांच्या बाबतीत घडू शकतं तसं संजू-विजूच्या बाबतीत पण घडू शकतं... फक्त संगतीमुळे.”

 

-       वरुण भागवत

Comments

  1. As usual khup sundar lihilai 🥁

    ReplyDelete
  2. who said this
    1. Give me a child I will make his anything!
    2.It is not heredity or environment but heredity and environment influence human development !

    ReplyDelete
  3. आपण चांगल्या लोकांचीच संगत धरुया.छान गोष्ट वरूण.

    ReplyDelete
  4. सुसंगती सदा घडो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...