Skip to main content

मित्राने थोबाडीत मारली आणि...


A Click by: Sushil Ladkat


“दादा, please यार, महेश माझ्याशी अशा पद्धतीने वागणार असेल ना तर खरंच त्याचा आणि माझा संबंध संपला. दोस्ती गेली तेल लावत.”

“Don’t overreact प्रशांत.”

“मी overreact करतोय?”

“तो चुकून तुझ्या अंगावर ओरडला असणारे.”

“चुकून?”

“हां... म्हणजे त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं tension असेल आणि तू wrong timing ला काहीतरी बोलला असशील. म्हणून म्हणलं चुकून ओरडला असेल.”

“असं कोणी चुकून ओरडतं का?”

“नुसतं ओरडत नाही... मारतं पण..”

“काय?”

“अरे त्या २ मित्रांच्या गोष्टीमध्ये नाही का अक्षय तुषारच्या कानाखाली मारतो.”

“असं अर्धवट सांगू नको.”

“२ मित्र म्हणजेच अक्षय आणि तुषार beach वर निवांत बसले होते. त्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि अक्षयने तुषारच्या कानाखाली वाजवली.”

“आणि मग?”

“मग काय... तुषार ने समुद्रकिनाऱ्यावरच्या रेतीत लिहिलं- आज माझ्या मित्राने मला थोबाडीत मारली.”

“इतकंच?”

“हं... थोडा वेळ शांततेत गेला. हे होऊन सुद्धा त्यांचा समुद्रात मस्त डुबकी मारायचा plan काही बदलला नाही.”

“आश्चर्य आहे.”

“कदाचित मिटवलं असेल त्यांनी. may be अक्षय sorry म्हणाला असेल.”

“तुषार ने उलटा हात नाही उचलला?”

“मैत्रीत असं नसतं प्रशांत. त्यांच्या मैत्रीत तरी नव्हतं. So, मग ते दोघेही समुद्रात थोडे आत गेले. नेमकी एक मोठी लाट आली आणि अक्षयच्या लक्षात आलं की तुषार पाण्यामध्ये गटांगळ्या खातो आहे. अक्षय पट्टीचा पोहणारा असल्याने त्याने पटकन तुषारला वाचवलं. सुरक्षितपणे पाण्याबाहेर आणलं. तुषार किनाऱ्यावर शांत बसला होता. मध्ये थोडा वेळ गेला. तुषार तिथून उठला. तुषारने जवळ असणारी एक टोकदार वस्तू उचलली. तिथून थोड्या अंतरावर एक दगड होता. तुषार दगडाजवळ गेला. त्याने दगडावर कोरलं- आज माझ्या मित्राने मला मरणाच्या दारातून वाचवलं.”

 

प्रशांतला त्या क्षणी तो प्रसंग आठवला जेव्हा त्याचा accident झाला होता आणि त्याला पहिलं हॉस्पिटल मध्ये नेऊन प्रसंगाचं भान जपणारा महेश आठवला. प्रशांत एकदम शांत झाला.

त्याने दादाला विचारलं, “दादा, पण या गोष्टीत तुषारने त्याच्या बाबतीत घडलेले चांगले-वाईट दोन्ही प्रसंग लिहिलेच की. मग यात...”

प्रशांत ला तोडत दादा म्हणाला, “खरंय. पण त्याला थोबाडीत बसली होती ते वाक्य त्याने रेतीत लिहिलं, जे येणाऱ्या लाटांसोबत पुसलं गेलं. मात्र अक्षयने त्याचा जीव वाचवला ते वाक्य त्याने दगडात कोरलं. मतितार्थ लक्षात घे. वाईट गोष्टी पटकन let go करता आल्या पाहिजेत. Memory चांगल्या गोष्टींची जमवायची. महेश च्या मनात काही नसतं हे तुलाही माहितीये. माफ करता आलं पाहिजे. माफी सोड, वाईट तेवढं सोडून देता आलं पाहिजे. असं ego वर घेतलंस तर ‘मैत्री’ या शब्दाला किंमत राहणार नाही. तू त्याच्याशी संबंध संपवून जिंकशील सुद्धा पण त्या जिंकण्याला काय अर्थ आहे ज्याचा आनंद घेता येऊ शकत नाही? त्याच्याशी न बोलून तू खुश राहशील का? मनाच्या कागदावर चांगल्या गोष्टींची आठवण कोरावी. बाकी कागद कोराच ठेवावा. नव्या आठवणी कोरण्यासाठी.”    

तेवढ्यात प्रशांत ची message tone वाजली. महेश चा message होता. “sorry यार आज जे झालं त्याबद्दल... तुला भेटावं वाटतंय. वेळ आहे?”

प्रशांतचा आपसूक reply गेला, “भरपूर!”

 

-वरुण भागवत

Comments

  1. व्वा व्वा अप्रतिम.. छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप मोठी छान शिकवण मिळत आहे

    ReplyDelete
  2. Friendship is forever beloved of love... 🙋😍👌👍
    Khup Chan ☺

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...