Skip to main content

दृष्टीकोन

A click by: Varun Bhagwat 


प्रत्येकाचा आयुष्य जगण्याचा आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन फार वेगळा असतो. जो तो आपापल्या नजरेने, आपापल्या तऱ्हेने आयुष्याकडे कसं बघायचं हे ठरवत असतो. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की समोरच्याची अशी mentality कशी असू शकते आणि समोरच्याला प्रश्न पडतो की आपली mentality तशी असूच कशी शकते? उत्तर मिळत नाही. आपण अस्वस्थ होतो. पण पुन्हा प्रत्येक जण वेगळा आहे.  मूळ स्वभाव बदलत पण नाही. या सगळ्या विचारांनी आणि प्रश्नांनी अक्षयला अक्षरश: दिवसभर घेरलं होतं.

त्याला वाटायचं की सगळी माणसं त्याच्यासारखी सरळ जगतात. पण हळूहळू दुनियादारी कळत होती. निरनिराळी माणसं त्याला भेटत होती. योगायोगानेच या प्रश्नांची उत्तरं त्याला स्वत:लाच त्याच रात्री वाचलेल्या गोष्टीतून मिळाली.

एक होता बैल. तो खूप राबायचा, कष्ट करणं त्याला ठाऊक होतं. एक होती पिसू. हिला काम हा शब्दच माहित नाही. कोणीतरी काम करतंय हे पाहून तिला विशेष आश्चर्य वाटायचं. जसं या बैलाला ही पिसू काहीच काम करत नाही यावरून आश्चर्य वाटायचं. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा होता. पिसू चा वेळ जात नसे. बैलाला मोकळा वेळ मिळत नसे. अशाच रिकामटेकड्या वेळात पिसूने बैलाला विचारलं, “काय भाऊ, किती काम करता... राब राब राबता... लोकांची ओझी उचलता... मी बघ. लोकांचं रक्त पिते बस्स!”

बैल म्हणाला, “खरंय. तू फक्त तेच करू शकतेस. मी कष्ट करतो. पण मग माणसं माझ्याशी प्रेमाने वागतात. चांगलं खायला देतात. मला आसरा मिळतो.  दमलो की मला छान थोपटतात आणि माझ्यावर प्रेम करतात. मला कौतुकाची थाप देतात.”

पिसू तिच्याच तोऱ्यात म्हणाली, “मला पण थाप देतात. पण मी ती घेत नाही. मी ती चुकवते. ती थाप जर मला बसली, तर तो माझा शेवट असेल..”

गोष्ट वाचून संपली.  अक्षयला वाटत होतं की आपण इतके कष्ट करतो एक कौतुकाची थाप मिळविण्यासाठी. मात्र कितीतरी जण असे असतात ज्यांना ही थाप किंवा माणूस जपणं वगैरे दुरापास्त असतं आणि त्यांना फरक पण पडत नाही. ही माणसं फक्त फायदा बघतात. पण पुन्हा त्याला जाणवलं की माणसं विविध प्रकारची आहेत. कोणी थाप मिळवण्यासाठी जगतं तर कोणी थाप चुकवण्यासाठी!  


प्रत्येक जण आपण बदलू शकत नाही. प्रत्येकाला बदलायला सुद्धा जाऊ नये. प्रत्येकाचा दृष्टीकोन ठरलेला असतो. तो आपण फार बदलू शकत नाही. आपण आपल्याला योग्य वाटतं ते मात्र नक्की करू शकतो. आपण बैल आणि पिसू याच्या मधलं काहीतरी होऊ शकतो. फक्त कौतुकाची थाप घेणारे नाही तर देणारे पण बनू शकतो. आपण बघू तसं जग आहे. आपला दृष्टीकोन आपलाच आहे.


-       वरुण भागवत


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...