Skip to main content

द्वेष

A click by: Varun Bhagwat

मिस्टर शर्मा या अनेक वर्षं corporate life चा अनुभव असणाऱ्या senior व्यक्तीशी आज समीर ची भेट झाली. या माणसाचा अनुभव नक्कीच खूप काही शिकवून जाणार होता. त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना भेटायला तो सहज wish करायला गेला होता. त्यांच्या घरून निघताना आपल्या घरी परततानाच्या प्रवासात तो झालेल्या चर्चेची उजळणी करत होता. समीर आता business विश्वात चांगला पाय रोवून होता. समीर च्या career च्या सुरुवातीलाच त्याची शर्मांशी भेट झाली होती आणि आता ते retired झाले होते. मात्र समीर न चुकता त्यांना birthday wish करायला जायचा. आजही तो गेला तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं,

“तू एकमेव आहेस, जो न विसरता प्रत्येक वाढदिवशी मला फक्त wish करण्यासाठी खास येतोस.”

“सर तुमचं आपलं काहीतरीच. तुमचे कितीतरी भक्त असतील.”

“आहेत ना. मित्र आहेत रे. . तू म्हणतोस तसे भक्त आहेत. पण या क्षेत्रात मित्र आणि आणि भक्तांसोबत शत्रू आणि द्वेष करणारे पण असतात.”

“ते आहेच. पण कोण असं किती द्वेष करू शकतं?”

“Do you want to know?”

“अर्थात. एक story तो बनती है!”

“खूप आधी वाचलेली गोष्ट; पण it makes sense.”

“सांगा ना.”

“एकदा ना दोन business मधले बादशाह एका बोटीतून प्रवास करत होते. Business चं field सारखं असल्याने अर्थातच competition तगडी. नुसती competition असेल तर ठीक आहे रे. पण हे दोघे एकमेकांचा द्वेष करायचे.”

“That is part and parcel.”

“एका limit पर्यंत ठीक आहे. पण यांचा hatred अतीच होता. ते त्या बोटीत असताना समुद्रात वादळ आलं. इतकं की सगळ्यांना जाणवलं की आता मरण अटळ आहे. हे असून सुद्धा त्यातला एक businessman त्या बोटीमधल्या समुद्राच्या जाणकाराला म्हणाला, “काय हो बोटीचा तिकडचा भाग आधी बुडेल की आपल्या इकडचा?” तो माणूस म्हणाला, “तिकडचा.” businessman म्हणाला, “मग ठीक आहे. मला मरण आलं तरी चालेल, पण माझ्या शत्रूचं मरण पाहण्यातला आनंद मला गमवायचा नाही. आधी तो मरेल मग मी.”

 

हा संवाद आठवताना समीर कधी घरी पोचला त्याला कळलं पण नाही. त्याला जाणवलं की मिस्टर शर्मा दोन businessmen ची गोष्ट करत होते त्यातला एक तो होता आणि दुसरा कुमार. समीर आणि कुमार कट्टर business rivals. त्या बोटीतल्या शत्रूसारखे. समीर चिंतन करत होता. त्याला जाणवत होतं, शर्मा हेच सांगायचा प्रयत्न करत होते की आपण गाळात असताना समोरचा आपल्याहून जास्त गाळात जात आहे हे पाहण्यात मजा येत असली तरी काही काळाने तीच वेळ आपल्यावर पण येणार आहे. दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा आपण आपल्या business वर जास्त concentrate केलं पाहिजे असं तर शर्मा सुचवत नसावेत?

 

-वरुण भागवत

Comments

  1. Masta! Very true and apt for a corporate life.
    There's a saying that goes like this- "Be good to people on your way up. You'll need the same people on your way down. And coming down is guaranteed."

    Very nicely expressed! 👏👏

    ReplyDelete
  2. तुझे blogs वाचून म्हणावंसं वाटतंय, रोज एक story तो बनती हैं..

    ReplyDelete
  3. तुझे blogs वाचून म्हणावंसं वाटतंय, रोज एक story तो बनती हैं..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...