Skip to main content

विचार आणि निर्णय

A click by: Varun Bhagwat


उन्हाळ्याचे दिवस होते. तापमान भयंकर वाढलं होतं. पाणवठे कोरडे पडत चालले होते. २ बेडूक जिथे राहत होते तिथला पाणवठा पण पूर्ण कोरडा झाला होता. त्यांना तिथून हालणं भाग होतं. बदलाचा स्वीकार गरजेचा होता. नाईलाज होता. ते पाण्याच्या शोधात निघाले.  खूप कष्टाने एक विहीर त्यांना सापडली, ज्यात थोडं पाणी शिल्लक होतं. एका बेडकाने तिथेच ठाण मांडलं आणि म्हणाला, “आपण इथेच राहतोय.” दुसऱ्याने विहीर पाहिली आणि खूप खोल असलेलं पाणी पाहून म्हणाला, “ऐक माझं, नको.”

पहिला वैतागून म्हणाला “तुला कळतंय का आपण किती कष्ट केलेत?”

“हो कळतंय.” दुसरा उत्तरला.

“मला नाही वाटत तुला कळतंय..”

“असं का?”

“जर तुला हे जाणवत असतं तर आज आपण इथेच या विहिरीचा आसरा घेण्याचा निर्णय पक्का केला असता.”

“पण मी नाही थांबायचं असं म्हणतोय..”

“तेच... असं का? असशील माझा senior... पण म्हणून ही मनमानी बरी नव्हे.”

“ही मनमानी नाही तर याला holistic thinking असं म्हणतात.”

“काय म्हणतात?”

“Holistic thinking अर्थात समग्र विचार!”

“आपण इतक्या दुरून आलोय. कष्ट पडलेत. इथे पाण्याचा साठा आहे. काय हरकत आहे हा उन्हाळा इथे काढायला?”

“जवळच्या फायद्यासाठी दूरचं नुकसान सोसायचं हे मला पटत नाही.”

“Oh... philosophy नकोय.”

“Fact आहे.”

“ऐक माझं...  इथून चल. नंतर explain करेन.”

“Fine.”

ते तिथून पुढे निघाले. खूप चालले. प्रचंड कष्टानंतर त्यांना एक मोठं तळं सापडलं ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी होतं. उन्हाळ्याची चिंता खरी खरी मिटत होती. दोघेही ते बघून खुश झाले. कष्टाचं चीज झालं होतं.

पहिला बेडूक काहीतरी आठवून म्हणाला, “By the way, हे holistic thinking काय असतं?”

दुसरा म्हणाला, “आत्ता तू पाण्याचा आनंद घे. आत्ता नको माझी philosophy.”

पहिला बेडूक हसला आणि पाण्यामध्ये मनसोक्त डुंबू लागला. मध्ये काही दिवस गेले. ते जी विहीर सोडून पुढे आले होते, त्याच गावात राहणारी एक बाई त्या तळ्याकाठी आली. ती तळ्यातून पाणी भरू लागली आणि स्वत:ला म्हणाली, “नशीब ह्या तळ्यामुळे पाणी तरी मिळतंय. गावातली विहीर कोरडीठक्क आहे.” तिने पाणी भरलं आणि जाऊ लागली.

दोन्ही बेडकांनी हे बोलणं ऐकलं.

पहिला आनंदून गेला नि त्याचबरोबर शरमूनही गेला आणि दुसऱ्याला म्हणाला, “माझं चुकलं साहेब. You were right.”

दुसरा पहिल्याला म्हणाला, “Now, let me explain. आपण जर त्या विहिरीचा आसरा घेतला असता तर थोडे दिवस नक्की मजेत गेले असते पण नंतर विहीर कोरडी पडली असती. इतक्या खोल विहिरीतून आपल्याला बाहेर येणंसुद्धा मुश्कील झालं असतं. मग मरायचं आहे तर इथे कशाला? अजून थोडं शोधलं तर हवं आहे ते मिळेल ना... हा सगळा विचार मी तिथे केला. म्हणून तुला म्हणालो की जवळचा फायदा दूरचं नुकसान तर करत नाहीये ना? हा झाला समग्र विचार. पटकन घाईत केलेली कृती आपल्याच अंगलट आली असती. म्हणून हा निर्णय घेतला. थोडं जास्त exert करावं लागलं. I agree. पण फळ छान मिळालं ना...”

“Yes sir.. चला...”

“कुठे?”

“डुंबायला... Let’s celebrate.”

 

-       वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...