Skip to main content

ए दोस्त...

A Click by: Sushil Ladkat


“काय म्हणतायत तुमचे मित्र?”

“सगळे मस्त आहेत बाबा.”

“तशा सारख्या parties चालू असतातच तुमच्या. म्हणजे खुश दिसताय...”

“बाबा, you know ही सगळी पार्टीप्रिय मंडळी आहेत. It’s fun... right?”

“हं...”

नीरज बाबांशी हे बोलत असताना त्याच्या फोन वर काहीतरी करण्यात मग्न होता. आज नीरजच्या बाबांना नीरजशी गप्पा मारायला तसा निवांत वेळ मिळाला होता. किती दिवस ते खरंतर या विषयावर त्याच्याशी बोलायचा विचार करत होते. आज त्यांनी बोलायचं ठरवलं. नीरजचं typical teenager सारखं वागणं अगदीच त्याच्या वयाला शोभणारं होतं. मात्र बाबांना हे ही जाणवत होतं की नीरजची संगत म्हणावी तितकी चांगली नाही. अगदी वाईट होती अशातला भाग नाही. नीरजला म्हणायला खूप मित्र होते. मात्र त्यांच्या मते ते नावापुरतेच होते. नीरजचा एकच खरा मित्र होता अभिनव ज्याच्याशी सध्या नीरज बोलत नव्हता. त्याच्यावाचून आपलं काही अडत नाही आणि आपल्याला बाकीचे खूप मित्र आहेत हे तो दाखवत होता. बाबांच्या मते हे त्याचं फक्त cover होतं. बाबांनी थेट विषयालाच हात घातला.

“नीरज, या तुमच्या मित्रांमधला एक तरी मित्र तुला काही झालं तर वेळेला उभा राहील का?”

“हा काय प्रश्न आहे का? एक आवाज दिला की येतील.”

“दे मग आवाज.”

“काय?”

“Let’s take a test.”

“बाबा, माझा माझ्या मित्रांवर पूर्ण विश्वास आहे.”

“माझा नाही.”

“बाबा..”

“See, if you are confident, then prove it. एक छोटी test. चल, जो मित्र पहिल्यांदा येईल त्याला माझ्याकडून party.”

“बाबा, be careful. खूप जण येतील.”

“ते माझ्यावर सोड. कोणालाही फोन कर आणि सांग. आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये. मी संकटात आहे. बाकी काहीच बोलू शकत नाही. तुझी गरज आहे.”

“एवढंच?”

“हो. reply ची पण फार वाट पाहू नकोस. let’s see कोण येतंय?”

 

नीरजने पटापट फोन फिरवले. बाबांनी सांगितलेली tape सर्वांना ऐकवली. पुढचे २ तास ते वाट बघत बसले. कोणीच आलं नाही. नीरज अस्वस्थ होत होता.

“आज तशी सुट्टी आहे ना... त्यामुळे busy असायचं कारण नाही कोणाचं. नाही का?” बाबा बोलत होते. “आणि मी काय म्हणतो, अभिनव ला एखादा फोन...”

बाबांचं वाक्य तोडत नीरज म्हणाला, “नाही.”

बाबा म्हणाले, “बरं. कोणी येत नाहीये तोपर्यंत एक गोष्ट ऐकणार. ऐकच. संजू आणि राजू असे २ मित्र जंगलातून जात होते. राजू मोठ्या तोऱ्यात म्हणत होता की तुला काही लागलं तरी आपण आहे. तेवढ्यात एक अस्वल येताना दोघांनी पाहिलं. राजूला शेजारी एक उंच झाड दिसलं आणि तो त्या झाडावर पटकन चढून बसला. संजूला झाडावर चढता येत नव्हतं. अस्वल जवळ येतंय हे कळताच तो तिथेच आडवा झाला. श्वास रोखून धरत त्याने मेल्याचं सोंग केलं. अस्वल मेलेलं काही खात नाहीत हे त्याने ऐकलं होतं. किमान याने तरी आपल्याला खाऊ नये अशी तो आशा करत होता. अस्वल जवळ आलं. त्याच्या कानापाशी, तोंडापाशी त्याने थोडं हुंगलं आणि सरळ निघून गेलं. ते लांब गेल्यावर राजू झाडावरून उतरला आणि संजूला म्हणाला, “काय रे? तुझ्या कानात त्याने काय सांगितलं?” संजू शांतपणे म्हणाला, “ते म्हणालं की त्या झाडावर बसलेल्या मुलाशी कधीच मैत्री करू नकोस. जो संकटकाळी तुला सोडून गेला.”

  

तेवढ्यात बेल वाजली.

नीरज खुश होत म्हणाला, “मी म्हटलं होतं. कोणी ना कोणी येणार. मीच उघडतो दार.”

 

नीरजने दार उघडलं. समोर एक मुलगा खूप अस्वस्थ होता. नीरज दिसताच त्याला हायसं वाटलं. नीरज अवाक होऊन पाहत राहिला. समोर अभिनव होता. अभिनव घाईघाईत बोलू लागला, “नीरज यार, तू ठीके ना.. काय झालं? बाबांनी message केला की तू संकटात आहेस आणि त्यांना पोहोचायला वेळ लागतोय.”

तेवढ्यात बाबांनी मध्यस्थी केली, “are अभी तू तर गावाला होतास ना..”

अभिनव म्हणाला, “हो message बघून तशीच kick मारली आणि निघालो. म्हणून तर २ तास लागले. Is everything all right?”

 

नीरज आणि बाबांची नजरानजर झाली. बोलण्यासारखं काहीच नव्हतं. नीरजला फक्त बाबांनी मगाशी म्हटलेलं वाक्य आठवलं, “दोस्त कमी असले तरी चालतील पण वेळेला ते आपल्यासोबत उभे असले पाहिजेत.”

 

-वरुण भागवत

Comments

  1. गोष्टीची खूप छान मांडणी

    ReplyDelete
  2. Goshta shevatparent rangat aanalis! 📝
    Khup Chan !👌👍






    ReplyDelete
  3. आजच्या पिढीतील तरुणांचे डोळे उघडणारी कथा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...